

-सांसद आदर्श ग्राम-
गुळूंचे गावं
Created by-
Ashok D. Kumbhar
गावचा ईतिहास
मौजे गुळूंचे येथील वैशिष्ट्यपूर्ण “ काटेबारस ” यात्रा
अध्यात्म हा भारतीय संस्क्रुतीचा पाया आहे. ही संस्क्रुती विविधतेने नटलेली व परंपरांनी सजलेली आहे. शिव, क्रुष्ण, राम ही दैवते या संस्क्रुतीची प्रतिके आहेत. आजच्या आधुनिकतेच्या युगातही हि परंपरा आजही त्याच प्रभावीपणे टिकुन आहे. यातच अध्यात्मिक शक्तीचे रहस्य दडलेले आहे. अशीच एक परंपरा जपलेली आहे मौजे गुळूंचे येथिल श्री ज्योतिर्लीगाच्या काटेबारस यात्रेने.
महाराष्ट्राची सांस्क्रुतिक राजधानी असलेल्या पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक पुरंदर तालुक्यातील गुळूंचे हे छोटस गाव. पुरंदर म्हणजे त्रिपुरसन्हारक शिवसहस्त्रनामांपैकी शिवजींचे एक नाव असा शिवपुराणात उल्लेख आहे. भागवत सांप्रदायाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली त्या संत ज्ञानेश्वरांच्या कनिष्ठ बंधूची म्हणजेच श्री सोपानकाकांची समाधी ही याच तालुक्यात ‘सासवड’ येथे आहे. त्याच सासवडपासुन अवघ्या एक तासाच्या अंतरावरील गुळूंचे हे गाव. नजीक अखिल महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले श्री मल्हारीमार्तंड खंडोबा व अष्टविनायकांपैकी आद्य श्री मयुरेश्वर ही तिर्थक्षेत्रे.
गावच्या मध्यवर्ती भागातच श्री ज्योतिर्लींगाचे भव्य मंदिर विराजमान ज़ालेले आहे. सध्याचे मंदिर हे जिर्णोद्धरीत मंदिराचा परिसर चौकोनी, पुढे मोठी कमान असल्ले प्रवेशद्वार, सभामंडप त्यात असलेला मोठा नंदी, श्री गणेश मुर्ती, उजवीकडील भागात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर डावीकडील भागात श्री राम लक्ष्मण सीता मंदिर त्यानंतरमुख्य मंडप यात मध्यवर्ती ठिकाणी विस्थापित कासव त्यानंतर मंदिराचामुख्य गाभारा. ज्यामध्ये श्री ज्यतिर्लींगाचे स्वयंभु शिवलिंग दर्शनास जाण्यायेण्यास गाभा-यास एकच दरवाजा मंडपातुन बाहेर पडण्यासाठी उत्तरेस दरवाजा. मंदिराच्या परिसरातच श्री संत ज्ञनेश्वर महाराज व श्री दत्त मंदिर त्यापलिकडे पोवळी व ओढा.
याच ज्योतिर्लींगाचा, ग्रामदैवताचा वार्षिकोत्सव म्हणजे “ काटेबारस यात्रा ” सुरू होते कार्तिक महिन्यात. कार्तिकम्महिना हा श्री विष्णु आणि श्री शिव या दोघांनाही प्रिय आहे. याच महिन्यात वैष्णवांच्या महाएकादशी असतात. कार्तिक मास हा सर्व तीर्थ आणि यज्ञ यापेक्षा अधिक पवित्र असल्याचे पुराणात म्हटले आहे. कार्तिकी एकादशी विशेष पुण्यमयी आहे.
दिपावलीच्या शुभकाळात बलिप्रतिपदे दिवशी पहाटे शुभमुहुर्तावर श्री ज्योतिर्लींगास महाभिषेक होऊन घटस्थापनेने यात्रेचा शुभारंभ होतो आणि गावातील भक्तगणांच्या बारा दिवसांच्या शिवउपासनेला सुरूवात होते. या काळात हे भक्त बारा दिवस सात्विक उपवास करतात. यात मीठ व तिखट पुर्ण वर्ज्य. काही भक्तगण मंदिराच्या प्रांगणातच वास्तव्य करुन शिवभक्ती करण्यात तल्लिन होऊन जातात. या बारा दिवसांच्या काळात मंदिरात विविध धर्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, अखंड दिपदान केले जाते. पहाटे काकडाआरती, अभिषेक पुजा, सायंकाळी भजन-किर्तन व ढोल लेज़ीमच्या खेळात गावातील गावकरी देवाची पालखी घेऊन गावात जातात तिथे आरती करुन परत माघारी मंदिरात जातात असा हा दिनक्रम बारा दिवस चालतो.

